फार काही अपेक्षा नाहीये माझी
पण एखादा पाऊस होऊन ये ना कधीतरी..
कदाचित तेव्हा तुलाही कळेल,
'आभाळ दाटून येणं' म्हणजे काय असतं ते!!..
तुलाही असह्य होईल तो ताण..,
नि मग मनसोक्त बरसताना
अलगद होणा-या त्या रितेपणाचाही
मनस्वी आनंद घेशील तू..
माझं रडणंही निव्वळ व्यर्थ नसतं, हे,
कदाचित समजेल तुला...
पण एखादा पाऊस होऊन ये ना कधीतरी..
कदाचित तेव्हा तुलाही कळेल,
'आभाळ दाटून येणं' म्हणजे काय असतं ते!!..
तुलाही असह्य होईल तो ताण..,
नि मग मनसोक्त बरसताना
अलगद होणा-या त्या रितेपणाचाही
मनस्वी आनंद घेशील तू..
माझं रडणंही निव्वळ व्यर्थ नसतं, हे,
कदाचित समजेल तुला...
फारसा हट्ट नाहीच्चे मुळी माझा,
तुझ्या पावसातला एख्खादा जरी थेंब
माझ्या गालावर येऊन पडला ना,
तरी चिंब होऊन जाईन मी..
हां, आता नेहमीसारख्याच तेव्हाही ओलावतील माझ्या पापण्या,
कदाचित!!..,
आणि अगदीच न राहवून एख्खादा टिपूसही ओघळेल
माझ्या काजळकड्यावरून..
पण तो जेव्हा तुझ्या थेंबाला येऊन मिळेल ना..,
तुलाही जाणवेल त्यातली स्निग्धता.., कदाचित!!...
माझ्या गालावर येऊन पडला ना,
तरी चिंब होऊन जाईन मी..
हां, आता नेहमीसारख्याच तेव्हाही ओलावतील माझ्या पापण्या,
कदाचित!!..,
आणि अगदीच न राहवून एख्खादा टिपूसही ओघळेल
माझ्या काजळकड्यावरून..
पण तो जेव्हा तुझ्या थेंबाला येऊन मिळेल ना..,
तुलाही जाणवेल त्यातली स्निग्धता.., कदाचित!!...
तू पाऊस होऊन जेव्हा मातीत मिसळशील ना
तुझ्या ओल्या स्पर्शाने माझ्यासारखीच तीही शहारून जाईल बघ..
नि त्यावेळी तिच्या दरवळीचे ते मुग्ध धुमारे..
तेच कदाचित सांगतील तुला, माझं खरंच कित्ती प्रेम आहे तुझ्यावर!!..
शब्दाविना सांगण्याची नि अर्थावाचून समजून घेण्यातली
जी गंमत असते ना, तीही कळेल बघ तुला...
खरंच येशील का रे असा एखादा पाऊस होऊन अवचित कधीतरी?...
- चारुश्री वझे

.. मग बोलता-बोलता म्हणाले- "मध्यंतरी पाटलांकडून (पाटील आजोबा) वहिनींच्या निधनाचं कळलं.. त्या माऊलीच्या हातचं अन्न जेवलोय मी. हे ऐकून धक्काच बसला.. कधी दादांना भेटतोयसं झालं. पण तुमचा नवा पत्ता नव्हता माझ्याजवळ. मग परवा कार्यक्रमात आधी पत्ता लिहून घेतला एका कागदावर शेखरकडून. त्या दिवशी रात्री झोप नाही मला. दादांना भेटण्याची इतकी इच्छा झाली म्हणून सांगतो.. आमचं नातंच वेगळंय.. ते इतकं प्रेमाचं आहे ना, की.."- तोवर त्यांना इतकं भरून आलं की, त्यांचे सद्गतीत अश्रूच पुढलं बरंच काही सांगून गेले.. मघाशी म्हटल्याप्रमाणे दोघांच्याही मैत्रीला आता एक हळवीशी किनार लाभली आहे..