Sunday, 3 March 2019

..
कारण,
खूप बोलायचं होतं..
बोलण्यासारखंही खूप काही होतं..
शब्द तर अक्षरशः धुमाकूळ घालत होते..
पण आश्चर्य म्हणजे तू समोर आलास
तरी, एकही शब्द बाहेर पडला नाही तोंडून..
दातात अडकले की लाळेवाटे गिळले गेले,
देवंच जाणे..
.. हां, किंवा संपावर गेले असावेत बहुधा..
आपल्यातला संवादच मान्य नसावा त्यांना..
तू गेलास निघून.
बरंच काही बोलून.. बरचसं न बोलताच..
मीही परतले माघारी.
मग मात्र इतके भसाभसा बाहेर पडले ना शब्द..
..
पुन्हा एक कविता उमटली कागदावर..
विनाकारण
..

- श्री उवाच


1 comment:

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...