... बघ, पुन्हा अडकले मी या संज्ञा-संकल्पनांच्या फे-यात..
पण का कुणास ठाऊक, तुझा विचार मनात आला ना, की मी आपसूकच काहीशी बौद्धिक होऊन जाते. Generally, अशा वेळेस आजुबाजुचं वातावरण उन्हाळी असूनही, बहुतांशी मनांमध्ये गुलाबी थंडी साजरी होत असते.., पण मला मात्र तुझी 'राजकीय-सामाजिक-आर्थिक..' आणि अशा ब-याच 'इक'-'इय' प्रत्ययान्ति असलेल्या शब्दांबाबतची विश्लेषणे त्यातल्या प्रत्येक मुद्दयासहित तोंडपाठ झालेली असतात.. शाळेत, परीक्षेतील संभाव्य प्रश्नांची उत्तरे 21 अपेक्षितातून घोकूनही अनेकदा लक्षात राहायची नाहीत माझ्या!!.. इथे मात्र तू मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मीही विचार करायला लागते.., आपसूकच.. शाळेत कवितेचं रसग्रहणंही मी नवनीतमधून पाठ करायचे.. पाठ करायचे?!.. हसूच येतं आता त्याचं; आणि प्रश्नही पडतो.., इतका बदल कसा झाला माझ्यात?..
... अगदी सुरुवाती-सुरुवातीला आपण कॉलेजच्या कट्ट्यावर भेटायचो.. अख्खी संध्याकाळ तिथे घालवायचो.. तेव्हा तू , तुझे ते 'इक-इय'वाले जड शब्द, आणि त्याहूनही जड असलेले त्याबाबतचे तुझे विचार.., सगळंच नवीन होतं माझ्यासाठी!!.. तेव्हा आपण दोघंही प्रत्येकी एकच गोष्ट करायचो.. तू केवळ बोलायचास.. भरभरून.., आणि माझी फक्त श्रवणभक्ती सुरु असायची.. ब-याचदा तर सगळंच बाऊन्स जायचं माझ्या.., तरीही ऐकायचे.. ऐकतंच राहावसं वाटायचं.. मग कधी एखादा काहीबाही प्रश्न मी विचारला की त्यावर तू इतका फिदीफिदी हसायचास आणि मुद्दाम मला चिडवत म्हणायचास- 'केवढे 'मोठ्ठे' बालिश प्रश्न पडतात गं तुला?..', यात 'मोठ्ठे'वर जरा जास्तच जोर द्यायचास तू.. पण मग त्यानंतर, 'अशीच निरागस राहा.. कायम..', हे पुढलं वाक्य मात्र अगदीच मनापासून असायचं तुझं.. त्यामुळे, तुझ्यासाठी म्हणून स्वतःला बदलावं, असा विचारच कधी डोकावला नाही मनात!..
... ज्या पोटतिडकीने तू एखादा गंभीर मुद्दा मांडायचास, तितक्याच सहजतेनं तुझं ते मनमुराद हसणं- मनमोकळं बोलणं.. कदाचित तुझ्या या अंतर्बाह्य खरेपणामुळेच मी प्रेमात पडले असेन तुझ्या!!.. तेव्हा पडून गेले..; नकळतंच.. पण आता विचार करते तेव्हा; म्हणजे आत्ताश्या मीही विचार करायला लागलेय थोडा-थोडा.., तर सांगायचं म्हणजे, तुझं हे खरेपण आणखी आवडू लागतं मला.. आणि दरवेळी नव्याने, अंमळ जास्तीच प्रेमात पडते तुझ्या!!...
- तुझीच
पण का कुणास ठाऊक, तुझा विचार मनात आला ना, की मी आपसूकच काहीशी बौद्धिक होऊन जाते. Generally, अशा वेळेस आजुबाजुचं वातावरण उन्हाळी असूनही, बहुतांशी मनांमध्ये गुलाबी थंडी साजरी होत असते.., पण मला मात्र तुझी 'राजकीय-सामाजिक-आर्थिक..' आणि अशा ब-याच 'इक'-'इय' प्रत्ययान्ति असलेल्या शब्दांबाबतची विश्लेषणे त्यातल्या प्रत्येक मुद्दयासहित तोंडपाठ झालेली असतात.. शाळेत, परीक्षेतील संभाव्य प्रश्नांची उत्तरे 21 अपेक्षितातून घोकूनही अनेकदा लक्षात राहायची नाहीत माझ्या!!.. इथे मात्र तू मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मीही विचार करायला लागते.., आपसूकच.. शाळेत कवितेचं रसग्रहणंही मी नवनीतमधून पाठ करायचे.. पाठ करायचे?!.. हसूच येतं आता त्याचं; आणि प्रश्नही पडतो.., इतका बदल कसा झाला माझ्यात?..
... अगदी सुरुवाती-सुरुवातीला आपण कॉलेजच्या कट्ट्यावर भेटायचो.. अख्खी संध्याकाळ तिथे घालवायचो.. तेव्हा तू , तुझे ते 'इक-इय'वाले जड शब्द, आणि त्याहूनही जड असलेले त्याबाबतचे तुझे विचार.., सगळंच नवीन होतं माझ्यासाठी!!.. तेव्हा आपण दोघंही प्रत्येकी एकच गोष्ट करायचो.. तू केवळ बोलायचास.. भरभरून.., आणि माझी फक्त श्रवणभक्ती सुरु असायची.. ब-याचदा तर सगळंच बाऊन्स जायचं माझ्या.., तरीही ऐकायचे.. ऐकतंच राहावसं वाटायचं.. मग कधी एखादा काहीबाही प्रश्न मी विचारला की त्यावर तू इतका फिदीफिदी हसायचास आणि मुद्दाम मला चिडवत म्हणायचास- 'केवढे 'मोठ्ठे' बालिश प्रश्न पडतात गं तुला?..', यात 'मोठ्ठे'वर जरा जास्तच जोर द्यायचास तू.. पण मग त्यानंतर, 'अशीच निरागस राहा.. कायम..', हे पुढलं वाक्य मात्र अगदीच मनापासून असायचं तुझं.. त्यामुळे, तुझ्यासाठी म्हणून स्वतःला बदलावं, असा विचारच कधी डोकावला नाही मनात!..
... ज्या पोटतिडकीने तू एखादा गंभीर मुद्दा मांडायचास, तितक्याच सहजतेनं तुझं ते मनमुराद हसणं- मनमोकळं बोलणं.. कदाचित तुझ्या या अंतर्बाह्य खरेपणामुळेच मी प्रेमात पडले असेन तुझ्या!!.. तेव्हा पडून गेले..; नकळतंच.. पण आता विचार करते तेव्हा; म्हणजे आत्ताश्या मीही विचार करायला लागलेय थोडा-थोडा.., तर सांगायचं म्हणजे, तुझं हे खरेपण आणखी आवडू लागतं मला.. आणि दरवेळी नव्याने, अंमळ जास्तीच प्रेमात पडते तुझ्या!!...
- तुझीच
अहो सरकार
(आज या सरकारास 25 वर्षे झालीयेत बरं!!.. आहे ना लक्षात?!..)
अप्रतिम स्वगत! अभिनंदन!- प्रा.उत्तम भगत
ReplyDelete